सांगली – छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करायला काय तालीबानी येणार आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते सांगली येथील झरे येथे माध्यमांशी बोलत होते.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/3069764816589019
गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांनी सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन असे भासवले की छकडा शर्यतीला विरोध नाही. आणि आता हे गृहखात्याच्या बळाचा वापर करून छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, नाकाबंदी करायला काय तालीबानी येणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी येत्या २० ऑगस्टला आटपाटी येथे बैलगाडी छकडा शर्यतीचे आयाेजन केले आहे. त्याअनुषंगाने पाेलिस विभाग शर्यतीच्या ठिकाणी तसेच अन्य परिसरात नाकाबंदी लावण्याच्या तयारीत आहेत. याबाबत आमदार पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.