Raireshwar temple – रायरेश्वरच्या मंदिरात (Raireshwar temple) छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्याची शपथ घेऊन ती पुर्ण केली. त्यामुळे या मंदिराविषयी सामान्य जनतेच्या मनात कमालीची श्रद्धा आहे. या मंदिराला बारा ज्योर्तिलिंगांप्रमाणेच तेरावे ज्योर्तिलिंग (Jyotirlinga) म्हणून जनतेने दर्जा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर या देवस्थानचा पहिल्या दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकास केला पाहिजे अशी मागणी देशभक्त केशवराव जेधे संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. या संस्थेचे प्रमुख संताजी जेधे यांनी या संबंधात राज्य सरकारकडे स्वतंत्रपणे निवेदन सादर केले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पवित्र रायरेश्वर मंदिराशी रयतेच्या भावना जडल्या आहेत. त्या लक्षात घेऊन या देवस्थानचा पहिल्या दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याची गरज आहे. तमाम महाराष्ट्रवासियांसाठी हे मंदिर तेराव्या ज्योर्तिलींगा इतकेच पवित्र आहे ही भावना लक्षात घेणे गरजेच आहे असेही संताजी जेधे यांनी म्हटले आहे.