करोना महामारीत बॉलीवूडमधील अनेक सिलेब्रिटीजनी पुढाकार घेत लोकांना मदत केली आहे. कोणी पैसांची तर कोणी उपाशी असलेल्यांना अन्नदान करत मदत केली.
विशेष करून सोनू सूद याने एक पाउल पुढे येत हजारो मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठविले. अक्षय कुमारने अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत पीएम केयर्स फंडला 25 कोटी रुपये दान दिले. सोशल मीडियावर आता यूजर्स आणि
चाहत्यांनी अक्षय कुमार आणि सोनू सूदला देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान “भारतरत्न’ देण्याची मागणी करत आहेत.
ट्विटरवर तीन दिवसांपासून यूजर्स ट्विट करत ही मागणी करत आहेत. तसेच करोनाच्या संकटात सोनू सूद आणि अक्षय कुमार हे मजूर आणि गरीबांसाठी देवच असल्याचे काही चाहत्यांनी म्हटले आहे.
यामुळे या दोघांना “भारत रत्न’ दिला पाहिजे.
एका यूझरने या दोन्ही कलाकारांनी केलेल्या कामाची यादीच प्रसिद्ध केली आहे. यापूर्वीही अक्षय कुमारने जवानांच्या कुटुंबीयांना आणि पुरग्रस्तांना मदत केलेली आहे. तसेच अक्षय कुमारने “भारत के वीर’ ऍप सुरू केल्याचीही आठवण करून दिली.
दुसरीकडे सोनू सूदने मजुरांना घरी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देत मुंबईतील आपले हॉटेल देखील करोना वॉरियर्ससाठी खुले करून दिले होते. तसेच पंजाबमधील डॉक्टरांना पीपीई किट देखील भेट दिली होती.