धायरी (प्रतिनिधी) – लोकांची कामे होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. त्यांच्याशी गोड बोला, त्यांची आपुलकीने चौकशी करा,माहिती घ्या त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची कामे मार्गी लावा. तरच लोक म्हणतील आपण निवडलेला प्रतिनिधी योग्य आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करून त्यांचा विश्वास संपादन करा. तरच आपण केलेल्या कामाची पावती मिळेल.
आपण केलेल्या कामाचा आनंद सत्तेत, पैशात मोजता येत नाही. लोकांचा विश्वास बसण्यासाठी त्यांना अपेक्षित असलेली कामे करा. असे प्रतिपादन खा. गिरीष बापट यांनी सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक मधील नगरसेवक हरिदास चरवड यांच्या निधीतून होत असलेल्या अमरज्योत चौक ते पाऊजाई मंदिर रस्त्याचे काँगक्रीटीकरण करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार भिमराव तापकीर होते यावेळी वडगाव बुद्रुक ची ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी माता मंदिराचे देखील भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका निताताई दांगट पाटील, राजश्रीताई नवले, अश्विनीताई पोकळे, नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, श्रीकांत जगताप,जि प.सदस्या जयश्री भुमकर, जयश्री पोकळे, खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत दांगट , बाळासाहेब नवले रमेश चरवड , भाऊसाहेब जाधव , अनिल चरवड , अँड .दिलीप गायकवाड , अँड सुभाष जाधव , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राजगुरू यांनी केले तर आभार केदार जाधव यांनी व्यक्त केले