Prakash Ambedkar – देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकतेच मतदान घेतलं आहे. ३ डिसेंबरला राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. संविधान सन्मान महासभेत बोलतांना त्यांनी मोदी सरकार टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले,’३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल, अशी शक्यता आहे. सध्यात देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जातं आहे. २००४ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या, असं सूचक विधान आंबेडकर यांनी केल आहे.
ते पुढे म्हणाले,’जनतेला माझं आवाहन आहे की, देशात भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. जे भडकवणारे नेते आहेत, त्यांना म्हणा… आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो. स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आणि लोकांना पुढे करायचं. स्वत:ला इजा होऊ द्यायच्या नाहीत, पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या, अशा भूमिकेपासून आपण सावध राहायला हवं.’ असेही आंबेडकर म्हणाले.