मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तुम्ही फक्त परीक्षा रद्द नाही केली साहेब तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात आता हे नक्की समजावून दिलं की ठाकरे सरकार आणि मी राजेश टोपे आम्हाला भरती घेता यात नाही.. आम्ही फक्त पैसे घेऊनच काम करतो😡 गरिबाच लेकरू ५०० कि. मी. ला जाऊन आता घरी जातंय.. त्याची माय १५०₹ रोजान शेतात जाती 🙏😡
— akshay_jayhind (@GhugeAkshayM1) September 25, 2021
ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांकडून व्हिडियो ट्विट करत महाराष्ट्र शासनाच्या कारभारावर टीका केली जात आहे.
आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.https://t.co/ghC8xrgOzu
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 24, 2021
एका ट्विट युजर अक्षय जयहिंद याने ट्विट केलं आहे की,’तुम्ही फक्त परीक्षा रद्द नाही केली साहेब तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात आता हे नक्की समजावून दिलं की ठाकरे सरकार आणि मी राजेश टोपे आम्हाला भरती घेता यात नाही.. आम्ही फक्त पैसे घेऊनच काम करतो गरिबाच लेकरू ५०० कि. मी. ला जाऊन आता घरी जातंय.. त्याची माय १५०₹ रोजान शेतात जाती ‘ असं ट्विट करत काहींनी आपला संताप व्यक्त केला आहे.
तर एका विद्यार्थ्याचा थेट परीक्षेच्या प्रवेश पत्रावर थेट उत्तरप्रदेशचे परीक्षा केंद्राचा पत्ता आल्यामुळे त्या विद्यार्था समोर परीक्षा केंद्रच्या पत्त्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत फेसबुक युजर्स नितेश कराळे यांनी पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.