जयपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा देशभर विरोध होत आहे. राजस्थानच्या भाजप आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना देशाचे शत्रू असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस या कायद्याला विरोध करत आहे.
Rajasthan BJP MLA, Madan Dilaawar: They do not have the right to live in this country. If they love Pakistan they should go there, if they love Bangladesh they should go there, and if both the countries don't want them, they can drown in the Indian ocean. (30.12.19) https://t.co/9vvdWKQZ1j
— ANI (@ANI) December 31, 2019
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ‘भाजपचे आमदार मदन दिलावर म्हणाले,’ जे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत देशाला जाळत आहेत. पोलिसांची हत्या करीत आहेत. जे निर्दशकांचे समर्थन करत आहेत ते देशाचे शत्रू आहेत. मग ते सोनिया गांधी, प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी असोत.
ते पुढे म्हणाले, ‘त्यांना या देशात जगण्याचा अधिकार नाही. जर त्यांना पाकिस्तान आवडत असेल तर त्यांनी तिथे जावे, जर त्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तिथे गेले पाहिजे आणि जर दोन्ही देशांना ते नको असतील तर त्यांनी हिंद महासागरात बुडावे. ‘
‘कॉंग्रेस वोटबँकच्या राजकारण करून लोकांमध्ये संभ्रम पसरवित आहे. कॉंग्रेसने या कायद्याला विरोध करून सिद्ध केले गांधीजींच्या तत्वज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही.