नवी दिल्ली -ज्या कुटुंबातील व्यक्तीचे करोनामुळे निधन झाले आहे, त्या कुटुंबांसाठी एक चांगली बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या मृत व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत या नुकसानभरपाईच्या संबंधातील गाइडलाइन्स आणि त्याची रक्कम निश्चित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिला आहे.
करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सुनावणीनंतर आज हा निर्णय देण्यात आला आहे. अशी नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाच्या न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी अध्यक्ष होते.