लोणी धामणी – सध्या लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्याच्या परिस्थितीत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यात लॉकडाऊनमुळे कांदा, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, त्याचप्रमाणे तरकारी पिकाच्या मालाला बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे सर्व पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेत मालाची वाहतूक ठप्प झाली आहे, ही वाहतूक थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या कांदा काढणीला आहे, तर कलिंगड, खरबूज तोंडणीला आले असून सर्वच माल शेतात पडून आहे. किमान भांडवल तरी वसूल होईल की नाही ही शंका आहे, असे वाळुंजनगरचे शेतकरी बाबाजी वाळुंज यांनी सांगितले.