नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला आहे. सत्तेत येण्यासाठी पंतप्रधानांनी मजबूत बनावट प्रतिमा तयार केली. ही त्याची सर्वात मोठी शक्ती होती. ही आता भारताची सर्वात मोठी कमजोरी आहे.
राहुल गांधी म्हणाले, लदाख सीमावाद साधारण नाही. मला चिंता आहे की चिनी आपल्या भूभागात बसले आहेत. चीन विचार न करता कोणतेच काम करत नसून त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार आहे. आणि स्वतःच्या मर्जीनुसार त्याला आकार देत आहेत. चीनची ही कृति देखील त्याच हेतूने प्रेरित आहे. ग्वादरही, बेल्ट अँड रोड त्याच अंतर्गत आहे. ही प्रत्यक्षात या जगाची पुनर्निर्मिती आहे, म्हणून जेव्हा आपण चिनींचा विचार करता तेव्हा आपण ते कोणत्या स्तरावर विचार करीत आहेत हे समजून घ्यावे लागेल.’
रणनीतिक पातळीवर चीन आपली स्थिती मजबूत करीत आहे. मग ते गॅलवान, डेमचोक किंवा पांगोंग लेक असो, त्याचा हेतू स्पष्ट आहे की मजबूत स्थिती निर्माण करीत आहेत. ते जर आपल्या महामार्गावर नाराज असतील तर त्यांना तो नष्ट करायचा आहे. हा फक्त साधा सीमा विवाद नाही तर भारताच्या पंतप्रधानांवर दबाव आणणे हा नियोजित सीमा विवाद आहे आणि ते विशेष मार्गाने दबाव आणण्याचा विचार करीत आहेत.
मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ‘एक प्रभावी राजकारणी होणे ही नरेंद्र मोदींची सक्ती आहे हे चीनला ठाऊक आहे. राजकारणी म्हणून राहण्यासाठी त्यांना आपल्या-56 इंच प्रतिमेचे रक्षण करावे लागेल आणि याच कल्पनेवर चीन आक्रमण करीत आहे. वास्तविक चीन मोदींना सांगत आहे. चीनला पाहिजे तसे तुम्ही केले नाही तर ते त्यांची बळकट नेत्याची प्रतिमा नष्ट करतील. आता प्रश्न पडतो की नरेंद्र मोदी यावर प्रतिक्रिया कशी देतील. ते चीनचा सामना करतील. चीनचे आव्हान स्वीकारतील. की म्हणतील मी भारताचा पंतप्रधान आहे. आणि मला माझ्या प्रतिमेची चिंता नाही.
नरेंद्र मोदी दबावात आले असून चीन आज आपल्या भूभागात आले आहेत. आणि नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केली नाही. यावरून स्पष्ट होते की मोदींना त्यांच्या प्रतिमीचे चिंता आहे. प्रतिमा टिकवण्यावर त्यांचे लक्ष आहे. जर ते चिनी लोकांना समजून घेण्याची संधी दिली की त्यांना प्रतिमेच्या भीतीने पकडता येईल, तर प्रधानमंत्री या देशासाठी काहीच उपयोगाचे राहणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
PM fabricated a fake strongman image to come to power. It was his biggest strength.
It is now India’s biggest weakness. pic.twitter.com/ifAplkFpVv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2020