मुंबई – सरलेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक कमालीचे अस्थिर राहिले. अनेकदा निर्देशांक वाढले तर नंतर लगेच कोसळले. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोमवारी निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढल्यानंतर मंगळवारी पुन्हा निर्देशांक एक टक्क्यांनी कमी झाले.
त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना निर्णय घेणे अवघड जात आहे. बुधवारी अमेरिकेचे पत धोरण जाहीर झाल्यानंतर आणि गुरुवारी भारतातील अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारांना दिशा मिळण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पात धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा कमी आहे. कारण सरकार आर्थिक सर्वेक्षणही जाहीर करणार नाही. मात्र तरीही यातून सरकारची भूमिका स्पष्ट होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. अमेरिकेच्या पत धोरणातील भाष्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बलेट 801 अंकांनी कोसळून 71,139 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 865 अंकापर्यंत कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 215 अंकांनी म्हणजे 0.99 टक्क्यानी कमी होऊन 21,522 अंकावर बंद झाला.
बजाज फायनान्स कंपनीचा चेहरा पाच टक्क्यानी कोसळला. त्याबरोबर काल मोठ्या प्रमाणात वाढलेला रिलायन्सचा शेअर आज कोसळला. टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एनटीपीसी या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. टाटा मोटर्स, स्टेट बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, पावर ग्रीड, टेक् महिंद्रा, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र त्याचा निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते. तर जपान मधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. अमेरिका व युरोपातही शेअर बाजार तेजीत होता. दरम्यान सध्या खनिज तेलाच्या किमती 83 डॉलरच्या जवळपास आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून यांची त्याची बाब समजली जात.
परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आज 110 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. गेल्या एक महिन्यापासून हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भारतातून गुंतवणूक काढून घेत होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना तपशिलात केवायसी एक फेब्रुवारी पासून लागू होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली आहे. आता हे गुंतवणूकदार विक्री थांबविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.