नवी दिल्ली – दूरसंचार, ऊर्जा, खाण क्षेत्रात सरकार आणि उद्योगादरम्यान बरेच कर विवाद चालू आहेत. ते कमी करण्यासाठी सरकारने या क्षेत्रासाठी विवाद से विश्वास योजना लागू करण्याच्या शक्यतेवर विचार करावा अशी सूचना असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने अर्थ मंत्रालयाला केली आहे.
मंत्रालयाने आगामी अर्थसंकल्पासाठी उद्योजकाच्या संस्थांकडून सूचना मागविल्या आहेत. असोचेमने म्हटले की, सरकारने या अगोदर प्राप्तिकर दात्याबरोबर इतर काही क्षेत्रासाठी विवाद से विश्वास ही योजना लागू केली होती. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहेत. त्यामुळे सरकार आणि करदात्यादरम्यानचे विवाद कमी होत आहेत.
अशा प्रकारची योजना इतर क्षेत्रासाठी लागू केल्यानंतर सरकार आणि उद्योगांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल. सध्या हे क्षेत्र आणि सरकारदरम्यान न्यायालयामध्ये बरेच विवाद आहेत. याचा निकाल लागेपर्यंत मूळ वादातील रकमेमध्ये अनेक पटीने वाढ होते. त्यातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे असोचेमने म्हटले आहे.