नवी दिल्ली -पोलंडच्या किल्से येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप युथ बॉक्सिंगच्या फायनलमध्ये सात महिलांसह आठ भारतीय मुष्ठियोद्ध्यांनी प्रवेश केला आहे. आजवरच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम आणि अभूतपूर्व कामगिरी आहे.
आठ अंतिम स्पर्धकांव्यतिरिक्त अन्य तीन जणांनी या स्पर्धेतील कांस्यपदकासाठी स्थान नक्की केले आहे. हंगेरीतील वर्ष 2018 मधील स्पर्धेतील दहा पदकांच्या कामगिरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याच्या उंबरठ्यावर भारत येऊन पोहोचल्याचे मानले जात आहे.
गुरुवारी अंतिम फेरी गाठणाऱ्या गटात गितिका (48 किलो), बेबीरोझीसन चानू (51 किलो), विंका (60 किलो), अरुंधती चौधरी (69 किलो), पूनम (57 किलो) थोकछम सनमचू चानू (75 किलो) आणि अल्फिया पठाण (81 किलो) यांचा समावेश आहे. पुरुषांपैकी केवळ सचिन (56 किलो) ने शिखर संघर्ष केला तर इतर तीन जणांनी कांस्यपदकांची निश्चिती केली.