शिरूर-हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार अत्यंत अभ्यासू, कार्यकुशल, सक्षम आणि नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व. वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला सक्षम वारसा पुढे चालवताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने कार्य करणारे अशोकबापू हे 2009 ते 2014 पर्यंत शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुमारे 41 हजार मताधिक्याने विजयी होऊन ते शिरूर-हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते स्वतः एक वकील असून त्यांचा कायदे, समाजकारण, राजकारण याचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन असून लोकहितासाठी नावीन्यपूर्ण कार्य करण्यावर त्यांचा भर आहे.
वडील तीर्थरूप रावसाहेब (दादा) पवार यांचा सामाजिक कार्याचा वारसा अशोकबापूंना लाभला आणि दादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक पवार यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. अशोक पवार हे प्रथमतः पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. पुढे घोडगंगा सहकारी कारखान्यात निवडणुका झाल्यानंतर चेअरमन म्हणून पद प्राप्त झालं. राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे व लोकांच्या सहकार्यामुळे राजकारणात मोठे यश मिळवण्यात ते यशस्वी झाले. आहेत. घोडगंगा सहकारी साखर कारखाना सर्वांगाने मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत. सर्वसामान्य राजकारण्यांपेक्षा आगळंवेगळं आणि नावीन्यपूर्ण काम करण्याची त्यांची हातोटी या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर गाजली. सरकारी योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबरीने मोठा संघर्ष त्यांनी पत्करला. “इनोव्हेटिव्ह वर्क’ या संकल्पनेला साकारण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. “टू चेंज सिस्टिमड टू इम्प्रूव्ह सिस्टीम’ हे त्यांच्या कार्याचे ब्रीद म्हणता येईल.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उभारणीतही आमदार अशोकबापूंचा मोठा वाटा राहिला आहे. जनसामान्यांसाठी आपल्या वडिलांची तळमळ आणि अविरत कार्य हेच अशोक पवार यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. वडिलांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी देखील मोलाचा हातभार लावला. अशा दूरदर्शी व्यक्तिमत्वाचा मुलगा म्हणून लोकांच्या अशोक पवार यांच्याकडून अशाच अपेक्षा होत्या. त्यातूनच लोक आग्रहास्तव राजकारणात बापू पुढे सक्रिय झाले. कोणतेही कार्य हाती घेतले की त्यास आधुनिकता, अभ्यास आणि व्यवस्थापन यांची जोड देण्याचा अशोक पवार यांचा प्रयत्न असतो. त्यातूनच विविध क्षेत्रामध्ये असंख्य नावीन्यपूर्ण कामे मर्यादित कालावधीत ते पूर्ण करत असतात. ज्याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. त्यांनी केलेली कामे ही महाराष्ट्रामध्ये नावाजली जाऊन त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.
आलेगाव पागा येथील नागरिकांच्या तक्रारीवरून रेशनिंगच्या होणारा काळाबाजाराला रोख लावण्यासाठी रेशनिंग सिस्टीमचा संपूर्ण अभ्यास अशोक पवार यांनी केला व रेशनिंगचं चावडीवाचन सुरू केलं. त्यातून मोठा भ्रष्टाचार निदर्शनास आला. अनेक दुकानदारांनी याला विरोध केला. त्यामुळे जीआर तयार करून घेतला व रेशनिंगच्या कारभारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम पुढे आणली. सुरुवातीला पाच गावांची परवानगी मिळवून हा उपक्रम प्रायोगिक पद्धतीवर राबविला. त्यामध्ये यश मिळाल्यावर संपूर्ण राज्यभर याला परवानगी मिळाली. आपल्या 2009 ते 2014 या कार्यकाळात पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी 2808 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिले. जे पूर्वी साठ वर्षात केवळ 1100 ट्रान्सफॉर्मर होते. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरसाठी पूर्वीप्रमाणे वर्गणी काढणे बंद झाले आहे. ट्रान्सफॉर्मर बसवण्यातील दिरंगाई दूर झाली. 2009 ते 2014 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना तब्बल 30 हजार वीजजोड दिले.
लोकनेते आमदार अशोकबापू पवार हे अत्यंत उच्चशिक्षित, अभ्यासू आणि कार्यकुशल आमदार असून प्रत्येकाच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने कार्य करतात. अनेक रुग्णांची व्यक्तिगतरित्या दखल घेऊन मोठी मदत मिळवून दिली. पद, प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचा एक नवा आयाम लोकांसमोर आणला. नावीन्यपूर्ण कार्य, प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून कौशल्यपूर्ण पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची पद्धत, संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे विशेषतः युवकांचा त्यांना भरभरून पाठिंबा लाभला. मतदारसंघात पुढे कोणती कार्य केली जातील. विकास कशाप्रकारे घडवून आणला याबद्दल त्यांचे प्रतिपादन अत्यंत अभ्यासपूर्ण असेच आहे. अशा या व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्ताने सहृदय खूप खूप शुभेच्छा!
बापूंचे निर्णय राज्याने स्वीकारले
सन 2009 ते 2014 मध्ये नागरिकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदारकीची संधी मिळाली. या कार्यकाळात अत्यंत नावीन्यपूर्ण, चिरंतन आणि स्थायी विकासाचे कार्य अशोक पवार यांनी आपल्या मतदारसंघात केले.
रेशनिंगची बायोमेट्रिक पद्धत, आरोग्य सेवेत विशेष योगदान, वीज व्यवस्थापन, शुद्ध पेयजल पुरवठा, नागरिकांशी थेट संपर्क, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न, गाळयुक्त शेती गाळ मुक्त धरण, स्वच्छतेचे अनेक कामे त्यांनी पार पाडली त्यातून घडून आलेल्या मतदारसंघाच्या विकासामुळे नागरिकांच्या मनात आजही त्यांचे स्थान अढळ आहे आणि म्हणूनच 2019 मध्ये नागरिकांनी पुन्हा अशोक पवार यांच्या बाजूने कौल दिला.
शंकर जांभळकर सभापती -कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर
शब्दांकन : विशाल वर्पे, करंदी, ता. शिरूर