भारताबरोबरचे सर्व करार पाळू – बांगला सरकार
नवी दिल्ली, दि. 18 – बांगलादेश व भारत यांच्यात झालेल्या सर्व समझोत्यांना व करारांना बांगलादेशाचे नवे सरकार मान देईल, असे त्या सरकारने भारत सरकारला अधिकृतरित्या कळविले आहे.
बांगलादेशाच्या नावात बदल नाही
बांगलादेश सरकारने भारत सरकारला असे कळविले आहे की, बांगलादेश प्रजासत्ताकाचे नाव कायम आहे. त्यात बदल झालेला नाही. नव्या सरकारने बांगलादेशाचे नाव बदलून “इस्लामी प्रजासत्ताक’ असा बदल करण्यात आला आहे, असे वृत्त पाश्चिमात्य वृत्त संस्थांनी प्रसिद्ध केले होते.
खेड्यांमधील परंपरागत सावकारी नष्ट करणार
नवी दिल्ली – ग्रामीण भागातील परंपरागत सावकारी सरकार मुख्यतः नव्या ग्रामीण बॅंकाद्वारे नष्ट करणार आहे, असे आज केंद्रीय अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी जाहीर केले. ग्रामीण भारताचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारांनी दुसरे उपायही योजिले पाहिजेत. सहकारी पतपुरवठा पद्धतीने जरी परिणामकारक यश आले तरी याचा फायदा ग्रामीण जनतेच्या सर्व थरांपर्यंत पोचू शकला नाही. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर त्यांनीही कृषि क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.
महाराष्ट्रात चंदनाची झाडे लावणार
मुंबई – पाचव्या योजनाकाळात 1000 हेक्टर क्षेत्रात चंदनाच्या झाडांची लागवड करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे.