गुवाहाटी – देशाच्या पूर्वोत्तर राज्यांना रविवारी भूकंपाचा हादरा जाणवला. आसाममधील गुवाहटीसह मेघालय, मणिपुर, मिझोरम अणि त्रिपुरा या राज्यांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 5.1 अशी रिक्टर स्केलवर नोंद झाली आहे. यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरमची राजधानी असलेल्या आयझलच्या ईशान्य दिशेने 25 कि.मी. अंतरावर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनी दिलेल्या माहितीनुसार हा केंद्रबिंदू जमिनीपासून 35 कि.मी. खाली होता.
दरम्यान, यापूर्वी 8 फेब्रुवारीला आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत दोन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे हादरे बसत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 12 एप्रिलपासून आजपर्यत सुमारे 14 वेळा धक्के जाणवले आहेत.