मलाप्पुरम – आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे पितामह डॉ. पी. के. वॉरिअर यांचे आज निधन झाले ते 100 वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात भारत व भारताबाहेरील हजारो रुग्णांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीने बरे केले आहे. त्यात भारतासह अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांचाही समावेश होता.
आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत त्यांनी मोठे संशोधनही केले होते व त्यात त्यांचा अतिशय दांडगा अभ्यास होता. आपले सारे आयुष्य त्यांनी आयुर्वेदिक औषधे आणि उपचार पद्धतीसाठीच व्यतित केले. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्या सह अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारत सरकारने त्यांना 1999 साली पद्मश्री आणि सन 2010 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कोट्टकल येथे आर्य विद्या शाळा स्थापन करून त्याद्वारे आयुर्वेदाचे पद्धतशीर शास्त्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता.