– डॉ. संज्ञा पुरोहित
ज्यावेळी एखाद्याला मधुमेह असल्याचे निदान होते ते सर्वप्रथम चहा किंवा कॉफीमध्ये साखर घेणं थांबवतात. या चयापचयाच्या आजारामुळे बरेच लोक हानिकारक कृत्रिम गोड पदार्थांकडे वळतात. माझे रुग्ण मला बऱ्याचदा सांगतात की, त्यांना गोड खाणं अजिबात आवडत नाही, पण तरीही त्यांना मधुमेह झाला आहे. टाइप 2 मधुमेह हा इन्सुलिन प्रतिकारक क्षमतेअभावी होतो. ह्याचा अर्थ शरीरातील इंसुलिनचा योग्यरीत्या उपयोग होत नाही.
जास्त वजनामुळे अशक्त ग्लुकोज सहिष्णुता निर्माण होते, ज्याचा अर्थ रक्तातील ग्लुकोजची पातळी ही नेहमीच सामान्यपेक्षा किंचित जास्त असते, पण हे टाइप 2 मधुमेह नाही. सर्व प्रकारचे कार्बोहायड्रेट अतिप्रमाणात खाण्याने देखील आपल्याला टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका असतो त्यामुळे केवळ साखर खाल्याने मधुमेह होतो हा गैरसमज आहे. केवळ साखरेचे सेवन कमी जास्त केल्याने मधुमेह होतो अथवा तो कमी होतो हा समज चुकीचा आहे. पण साखरयुक्त पेयांचा अतिरिक्त वापर आपणांस मधुमेह होण्याचा धोका वाढवतो केवळ साखरयुक्त चहा हानीकारक नाही.
पूर्वी एखादे मूल किंवा किशोरवयीन व्यक्तींना मधुमेह असल्याचे निदान झाले तर ते नेहमीच टाइप 1 मधुमेही असायचे. टाइप 1 मधुमेह हा इंसुलिनवर अवलंबून असलेला आजार आहे, जो अनुवंशिक समस्या किंवा बीटा सेल बिघडण्यामुळे होतो; परंतु दुर्दैवाने आता असे राहिले नाही. अस्वस्थ जीवनशैलीशी निगडित असलेल्या 8 वर्षांच्या मुलांनादेखील टाइप 2 मधुमेह असल्याचे निदान होत आहे. आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी लावण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्या आई-वडिलांनी करणं गरजेच आहे.
चांगल्या खाण्याच्या सवयींचे पालन आणि वारंवार व्यायाम करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. तरुण लोकांमध्ये मधुमेह टाळण्यासाठी, जंक फूड खाणे टाळावे व पौष्टिक आहाराचा समावेश असेल असे चांगले आणि सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचं आहे.
जगभरात मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही एड्स आणि स्तनांच्या कर्करोग मिळून होणाऱ्या संख्येपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे या स्थितीबद्दल गंभीर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. निदान झाल्यापूर्वीच टाइप 2 मधुमेह आपल्या शरीरावर परिणाम करत असतो. डॉक्टरला भेट देण्यापेक्षा लोक स्वत:ची लक्षणे घरच्या घरी हाताळण्यास प्राधान्य देतात. ते स्वतःचे विश्लेषण स्वतःच करतात; जसे जास्त तहान लागणे हे बहुदा गरम हवामानामुळे होत असावे, जास्त लघवी होणे हे जास्त प्रमाणात घेतलेल्या पाण्यामुळे होऊ शकते, धूसर दृष्टी ही बहुदा ताण वा धकाधकीच्या जीवनशैलीमुळे असू शकते.
जर आपणांस असा काही त्रास नियमितपणे होत असल्यास अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेहाचे लवकर निदान आपल्याला मधुमेह उलटवण्यास मदत करू शकते. अनियंत्रित शर्करा असलेला मधुमेहाचा रुग्ण हा हृदयाशी संबंधित समस्या, डोळ्यांवर परिणाम (रेटिनापोथी), मूत्रपिंड (नेफ्रोपॅथी), न्यूरोपॅथीवर होणारा परिणाम, यासारख्या गंभीर समस्यांच्या उंबरठ्यावर असतो जी निश्चितच गंभीर बाब आहे.
मधुमेह असलेल्या स्त्रियांसाठी गर्भवती होणे ही समस्या नाही. रक्त शर्करावरील योग्य नियंत्रणासह पूर्ण मुदतीचा गर्भधारणा करणे ही देखील समस्या नाही. मधुमेह असलेल्या महिलांनी त्यांच्या मधुमेहविशारद, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि पोषकतज्ज्ञ यांना गर्भधारणेच्या 6 महिने आधी भेट द्यावी. नवरा बायकोने पालकत्वचा विचार करण्यापूर्वी काही रक्तातील ग्लुकोजच्या लक्ष्यांना साध्य करणे हे आवश्यक आहे आणि निरोगी डिलिव्हरी राखण्यासाठी 9 महिने समान नियंत्रणाचे पालन केले पाहिजे.