बारामती -शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा टाकलेला कचरा जाळू नये तसेच वीजयंत्रणेला कोणत्याही प्रकारचे भित्तीपत्रके चिटकवू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांसाठी नवीन फिडर पिलर बसविण्यात आले आहेत. या पिलरवर तसेच इतर यंत्रणेवर छोटे-मोठे भित्तीपत्रके चिटकविण्यात आले असल्याने वीजयंत्रणेचे विद्रुपीकरण होत असून अपघात होण्याची शक्यता आहे.