मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यच लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. तत्पूर्वी राज्यभरातील राजकारणात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.निकाल येण्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते. नुकतीच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती त्यावरून ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. अशात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी एका आमदाराने केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
निकालापूर्वीच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नार्वेकरांच्या नार्को टेस्ट मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आमदारांच्या अपात्रतात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देशमुख बोलत होते त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
विधानसभेच्या अध्यक्षांना न्यायाधीशाचा दर्जा होता. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणं आणि वारंवार दिल्ली दरबारी हजेरी लावणं आणि विचारपूस करून निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. म्हणून नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. ते अतिमहत्त्वाचं आहे अशी मागणीच यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केली.
आमदार अपात्रता निकालापूर्वी राजकीय वातावरण तापले
आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटाच्या सर्व वकिलांची आज झूम कॉल मीटिंग झालीय.
वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे देखील या बैठकीत उपस्थित होते.
विशेष म्हणजे काल रात्री उशिरा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे, फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर पुन्हा रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या आहेत.