मुंबई – शिवसेनेशी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका होत आहे. तसेच विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांकडून फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
Maharashtra | Deputy CM Devendra Fadnavis gets a warm welcome as he arrives at Nagpur airport to visit his home after his recent victory in the government, takes out a road show from the airport. pic.twitter.com/WU7cHiS3d0
— ANI (@ANI) July 5, 2022
उपमुख्यमंत्री असतील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलं ज्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर विविध चर्चा होत असतानाच ब्राह्मण महासंघाने भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जातं आहे असं म्हटलं आहे. नितीन गडकरींपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनाही डावललं गेल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. सध्या सोशल मीडियावरही याच मुद्यावरून वाटेवरून तापले आहे.
तर आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. यावेळी विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर रोड शो देखील काढण्यात आला. या रोड शोमध्ये फडणवीसांनी सर्वांचे आभार मानले. मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी आणि रोड शोसाठी लावण्यात आलेल्या बॅनरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब होता. यावरून पुन्हा एकदा फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी डावलण्यात आल्याचे पडसात नागपूरमध्ये उमटले.
बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. त्यामुळे फडणवीस समर्थक अमित शहा यांच्यावर नाराज असल्याचे अधोऱेखित झालं आहे. या बॅनरवरील फोटोवरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.