नवी दिल्ली – केंद्र सरकारने आतापर्यंत डिजिटायझेशन मोहिमेअंतर्गत 25 लाख फाइलचे डिजिटायझेशन केले आहे. त्यामुळे या फाईल ठेवलेली 9 लाख वर्ग फूट जागा रिकामी झाली आहे.
राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक विजय श्रीनिवास यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी सांगितले की केंद्र सरकारने प्रशासनाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. त्यामध्ये फायलींचे डिजिटायझेशन ही एक महत्त्वपूर्ण घडामोडी आहे. आता केंद्रीय सचिवालयामध्ये 25 लाख फाइलचे डिजिटायझेशन झाले आहे. या डीजीटल फाईलच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. फक्त 10 लाख फाईल प्रत्यक्ष कागदोपत्री उपलब्ध आहेत.
फाइलचे डिजिटायझेशन झाल्यामुळे त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे त्या कार्यालयांची कार्यक्षमता वाढत आहे. 2014 पासून डिजिटायझेशची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. देशातील नोकरशाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.