मुंबई – देवेंद्र फडणवीस हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादानेच मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांच्या विषयी फडणवीस यांनी केलेले विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मान्य नसेल, असे सांगत 1993 च्या मुंबईच्या दंगलीत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य मी विसरू शकत नाही, असे प्रतीपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.
खडसे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनाही देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य मान्य नसावे. देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले होते. त्या मंत्रीमंडळात मीसुद्धा होतो. आपले राजकीय विचार बाजूला ठेऊन त्यांनी त्यांचा आदर ठेवायला पाहिजे होता. अलिकडे ते जी वक्तव्ये करत आहेत ती नैराश्यातून आलेली असावीत.
मुंबईत दंगल ऊसळली त्यावेळी मी आमदार होतो. रस्त्यावर रक्ताचे पाट वहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रस्त्यावर मदतीसाठी असंख्य जण उतरले. हे मी प्रत्याक्षात पाहिले आहे, असे ते म्हणाले.