कोलकाता : मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचा बागुलबुवा सत्ताधारी पक्षाकडून उभा केला जात आहे. मुस्लिम भारतावर ताबा मिळवतील ही खरी भीती नाहीच, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केले.
टाटा स्टील कोलकाता साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बॅनर्जी बोलत होते. भारत आणि अमेरिकेत एका महत्त्वाच्या मार्गावर विलक्षण साम्य आहे. तेथे अल्पसंख्यांक हे अल्पसंख्यांकच आहेत. ते वर्चस्व गाजवण्याच्या जवळपास कोठेही नाही, असे ते म्हणाले.
त्याचा अर्थ हा की तुमच्या मनात अल्पसंख्यांकाच्या बद्दल भीती बसावी, म्हणूनच सत्ताधाऱ्यांकडून मुस्लिम लोकसंख्यावाढीचा मुद्दा वारंवार उकरून काढला जातो. या सत्रात त्यांच्या गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम्स या त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि नोबेल विजेत्या इश्थर डुफ्लो यांनी लिहलेल्या पुस्तकावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अफ्रिकन अमेरिकन आणि मेक्सिकन हे अमेरिकेत हे अल्पसंख्य आहेत. तुम्ही लक्षात घ्या सर्वत्र अल्पसंख्यांकांचे गट हे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. बहुसंख्यांकातील एक लहान गट आर्थिक सबळ आणि अती शक्तीशाली आहे. मग ही भीती कोठून येते? कोणत्याच पातळीवर या दोन गटात समानता आढळत नाही, असे त्यांनी सांगितले.
तुम्हाला भीती असते की दुसरा गट अधिक प्रभावशाली होत आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नसते. मला वाटते त्यासंदर्भात फार अत्यल्प सत्यही त्यात नसते. वास्तावाचा त्यात अभाव असतो. त्यामुळे मुस्लीम भारताचा ताबा घेतील यात कणमात्रही सत्यता नाही, असे मला वाटतेअसे ते म्हणाले.
भविष्यात राजकारणात उतरण्याची शक्यता साफ फेटाळून लावत ते म्हणाले, अब्दूल लतिफ जमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅब ही संस्था काहीही उपयुक्त घडवायचे असेल त्यांच्यासोबत काम करेल. त्यामुळे राजकारणात जाऊन तसे काम करता येणार नाही. आमच्या लॅबकडून होणारे दारिद्य्र निर्मुलनाचे काम हे सर्वात उपयुक्त आहे. काही उपयुक्त करायचे असेल त्यांच्याशी आम्ही सर्वाधिक बांधील आहोत.
दोन्ही देशातील राजकारणाबाबत तुम्हाला चिंता वाटत असली तरी आम्ही भाजपासहीत सर्व पक्षीयांच्या राज्य सरकारसोबत काम करत आहोत,असे ते म्हणाले.