सातारा – वस्तुनिष्ठ बातम्या आणि समतोल वार्तांकन या माध्यमातून सातारकरांशी नाळ जोडणाऱ्या दै. “प्रभात’च्या सातारा आवृत्तीचा पाचवा वर्धापन दिन मंगळवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत हॉटेल राधिका पॅलेसच्या लॉनवर रंगणार आहे. वर्धापनदिनानिमित्त दै. “प्रभात’च्या कार्यालयाची इमारत वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला झळाळून निघाली होती.
दै. “प्रभात’ने पाच वर्षांपूर्वी सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये दिमाखात पदार्पण केले. सुज्ञ वाचक, जाहिरातदार, एजंट यांच्या पाठबळावर अनेक अडचणींचा सामना करून दै. “प्रभात’ने आपली वाटचाल कायम ठेवत नेहमीच समतोल आणि विकासात्मक वार्तांकनावर भर दिला. यामुळे सातारकरांनी “प्रभात’ला स्वीकारले.
वेगवेगळ्या पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांशी नाळ जोडली.करोनाच्या दोन वर्षाच्या कटू स्मृतीमुळे प्रभात परिवाराचा स्नेहमेळावा होऊ शकला नव्हता. मात्र, यावर्षी “प्रभात’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठया वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारकरांनी या स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थित राहवे, असे आवाहन दै. प्रभात परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.