नवी दिल्ली :- प्रत्येकजण 14 ऑक्टोबरची वाट पाहत आहे… खरं तर आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू झाला आहे. यावेळी भारताला विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रेक्षकांसह संपूर्ण जग 14 ऑक्टोबरची वाट पाहत आहे, कारण या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत होणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने या सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे… खरे तर रेल्वेने 14 ऑक्टोबरला मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून अहमदाबादसाठी विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन या महान सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना कोणत्याही अडचणीशिवाय हा सामना थेट पाहता येईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी तिकीट मिळणे खूप कठीण आहे. इतकंच नाही तर हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच ट्रेन आणि फ्लाइट तिकिटांच्या बुकिंगसाठी खूप वाट पाहावी लागते, अशा परिस्थितीत रेल्वेच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष ट्रेनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या…..
ट्रेनची वेळ आहे खूप खास…
या स्पेशल ट्रेनची वेळ खूप खास आहे, कारण ती अशा प्रकारे ठरवण्यात आली आहे की सामना सुरू होण्याच्या काही तास आधी प्रेक्षक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचतील, तर सामना संपल्यानंतर ते सहजपणे घरी परत जाऊ शकतात. म्हणजेच मॅच सुरु होण्याच्या काही तास आधी या ट्रेन अहमदाबादला पोहचतील आणि मॅच संपल्यानंतर परतीच्या ट्रेनही उपलब्ध असतील. त्यामुळे चाहत्यांचा हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचा खर्च वाचणार आहे. ही ट्रेन मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून अहमदाबादसाठी असेल.
अहमदाबाद आणि साबरमती स्थानकाजवळून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडीयमला पोहचणे सोपे असल्याने या वंदेभारत एक्सप्रेस या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत
आणि बरेच काही…
इतकंच नाही तर रेल्वे प्रवास आणखी संस्मरणीय करण्यासाठी या वंदेभारत ट्रेनमध्ये देशभक्तीपर गीते ऐकायला मिळतील. तसेच या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या ऐतिहासिक व चुरशीच्या सामन्याची क्षणचित्रे स्क्रीनवर दाखविण्यात येतील.