नवी दिल्ली- देशात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यानंतर आता कोविड-19 ची तिसरी लाट देशात दाखल झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 37 हजार 379 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 124 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर देशात कोविड-19 चे एकूण रुग्ण 3 कोटी 49 लाख 60 हजार 261 वर पोहोचले आहेत. तर त्याचवेळी या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 82 हजार 14 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाककडून प्राप्त झालेल्यामाहितीनुसार, करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1 लाख 71 हजार 830 वर पोहोचली आहे. आतापर्यंत करोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 43 लाख 6 हजार 414 झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.