नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर आणि कपड्यांच्या रंगावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.
पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या बोल्ड डान्स स्टेप्सला आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्यामुळे ट्रोल केले जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असे सांगितले आहे.
दरम्यान, आता चित्रपटातील हाच मुद्दा उपस्थित करत आंदोलन करण्यात आलं आहे. वीर शिवाजी नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानच्या पुतळे जाळण्यात आले. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा काय? म्हणाले….
फिल्म #Pathan के गाने में टुकड़े-टुकड़े गैंग की समर्थक अभिनेत्री दीपिका पादुकोण की
वेशभूषा बेहद आपत्तिजनक है और गाना दूषित मानसिकता के साथ फिल्माया गया है।
गाने के दृश्यों व वेशभूषा को ठीक किया जाए अन्यथा फिल्म को मध्यप्रदेश में अनुमति दी जाए या नहीं दी जाए,यह विचारणीय होगा। pic.twitter.com/Ekl20ClY75— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) December 14, 2022
“गाण्यात करण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणे चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दीपिका पदुकोण जी जेएनयू प्रकरणात तुकडे-तुकडे टोळीच्या समर्थक आहे या कारणास्तव, मी विनंती करेन की यातील दृश्ये ठीक केली पाहिजेत. वेशभूषा ठीक करा, अन्यथा मध्य प्रदेशात या चित्रपटाला परवानगी मिळणार की नाही, यावर विचार करावा लागेल’ असं मिश्रा यावेळी म्हणालेत.