वर्धा : काँग्रेसच्या ‘आझादी गौरव यात्रे’ला वर्ध्यातून सुरुवात झाली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ही यात्रा काढण्यात येत आहे.
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून या आझादी गौरव यात्रेला सुरुवात झाली.यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनिल केदार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. ही यात्रा राज्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. 14 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान, या पदयात्रेद्वारे काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून केंद्रातील भाजप सरकारकडून होत असलेल्या सुडाचे राजकारणाबद्दल भूमिका मांडली जाणार आहे.