नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून बिहार सरकारमधील धुसपूस पाहायला मिळत होती. नितीश कुमार यांचा जेडीयू व भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये एकत्र असले तरी त्यांच्यात खटके उडत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. अशातच आता नितीश कुमार हे आज एनडीएमधून बाहेर पडले असून भाजपसोबतची राज्यातील युती देखील ते तोडणार आहेत. नितीश कुमार हे सायंकाळी ४ वाजता राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील असं बोललं जातंय. नितीश कुमार यांच्या या राजकीय खेळीबाबत राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या व बिहारमध्ये सत्ताधारी गटात असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने आता नितीश कुमार यांच्या राजकीय खेळीबाबत भाष्य केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती पारस यांनी याबाबत बोलताना, “राज्यामध्ये जेडीयू व राजदने यापूर्वी देखील एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते फार काळ एकत्र राहू शकत नाहीत हा इतिहास आहे. हे बिहारच्या विकासासाठी योग्य नाही.” असे सांगितले. यावेळी त्यांनी, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य करताना पारस यांनी, आपला पक्ष एनडीएचा घटक पक्ष म्हणून कायम राहील असे देखील स्पष्ट केले.
Earlier also an experiment was done between RJD & JDU but they can’t stay together for long. Again such an alliance is coming, it’s not a good sign for Bihar’s development. We have decided that our party will remain a part of NDA: Union min & RLJP President Pashupati Paras pic.twitter.com/orVpScMDL3
— ANI (@ANI) August 9, 2022
बिहार विधानसबभा निवडणुकांमध्ये भाजप व जेडीयू एकत्र लढले होते. राज्यात नितीश कुमार यांच्या जेडीयू व भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. ठल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात टाकण्यात आली परंतु मंत्रिमंडळात मात्र भाजपचाच वरचष्मा राहिला. विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पीछेहाटीमुळे नितीश कुमार सुरुवातीपासूनच व्यथित होते.
अशातच, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात भाजपने पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. भाजप राज्यात हातपाय पसरत असल्याने जेडीयूचे नेते नाराज होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह हे जेडीयूमधून बाहेर पडल्याचे निमित्त झाले व जेडीयू-भाजपची युती तुटली असं राजकीय जाणकार सांगतात.