पणजी – गोवा कॉंग्रेसने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला. फडणवीस यांची महाराष्ट्रातील सत्ता त्यांना पार्ट-टाईम वाटणाऱ्या पक्षानेच घालवली, असा शाब्दिक टोला प्रदेश कॉंग्रेसकडून लगावण्यात आला.
गोवा कॉंग्रेसच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई-नाईक यांनी फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. गोव्यात प्रभावी नेत्याला पुढे आणण्यात भाजपला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे त्या पक्षाला इतर पक्षांतून नेत्यांची आयात करावी लागत आहे. आयात नेत्यांवरच भाजपची भिस्त आहे. भाजपला स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागत आहे, असे त्या म्हणाल्या.