कडूस, चास परिसरात सुहास दिवसे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी केली चर्चा
राजगुरूनगर – खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतातील हाताशी आलेल्या भात, सोयाबीन, बटाटा, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची रविवारी (दि. 3) राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी कडूस, चास कमान परिसरातील बांधावर थेट जात पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांना धीर दिला.
यावेळी त्यांच्यासमवेत पुणे विभागाचे कृषी विभागीय अधिकारी दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरूनगर संगीता माने, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. खेड तालुक्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ऊस, बटाटा आदि नगदी पिकांचे नुकसान झाले अजूनही पाऊस पडत असल्याने नुकसानीत वाढच होत आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. पाहिले अतिवृष्टीने नुकसान झाले आता हाताशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
यात शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनानाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे करीत आहेत त्यांची दखल कृषी विभाग महसूल विभागाने घेतली असून आज कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील कडूस, चास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.