मुंबई: आचारसंहिता भंगाचे गुन्हे भाजपा नेत्यांवरच सर्वाधिक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. ‘सांगलीच्या महापौर संगीता खोत यांची कमळाचं चित्र असलेली साडी चिखल उडवून गेली. दिल्लीच्या टॅक्सींवर प्रवासी मोदीजींचं विमान उतरलं. प्रधानमंत्री आवास योजना ट्रेन तिकिटांपुरती राहिली, बायोपिकवरही फुली मारली गेली’ अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.
भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय. आझम खान यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबाबत रामपूर येथील भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. ही सगळी भाजपा नेत्यांना पराभव दिसत असल्याचीच लक्षणे असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
https://www.facebook.com/NCPSpeaks/photos/a.314007098737127/1366151263522700/?type=3&theater