उरुळी कांचन -मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या रोगांनी डोके वर काढले आहे.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता डेंग्यूचा आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यू नियंत्रणात असला तरी करोनाशी लढा देताना नागरिकांना डेंग्यूपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
मागील पंधरा दिवसांत विविध रुग्णालयांत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. अगोदरच करोनाचा समावेश झाला आहे. त्यातच करोना पाठोपाठ डेंग्यूचा चोर पावलाने शहरात प्रवेश झाला असला तरीही करोना बाधितांची संख्या आढळून येत आहे.
वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीत वाढ होताना दिसून येत आहे.
दरम्यान, करोनाचा प्रभाव कमी होत असताना जुलै महिन्यातच डेंग्यू व चिकुणगुनिया साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे.
घर, परिसरात स्वच्छता ठेवावी
महामार्ग तसेच गॅरेजेसच्या ठिकाणी असलेले निकामी टायर, गरज नसलेले निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रे मध्ये स्वच्छता ठेवावी. तसेच नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरात डेंग्यू व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब जरी खरी असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता आजूबाजूचा परिसर व फ्रीजच्या पाठीमागे जमा होणारे पाणी काढून टाकावे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत यांच्याशी डेंग्यू व चिकुनगुनिया संदर्भात बैठक झाली असून लवकरच याविषयी उपाययोजना केल्या जातील.
– सुचेता कदम, वैद्यकीय अधिकारी, उरुळी कांचन.