पेंद्रा (छत्तीसगड), – रविवारी सकाळी छत्तीसगडमधील गौरेला-पेंद्रा-मारवाही आणि कोरबा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागाला भुकंपाचा 3.6 तीव्रतेचा सौम्य हादरा बसला. दोन जिल्ह्यांच्या काही भागात आफ्टरशॉकही जाणवले, परंतु आतापर्यंत कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेंद्र शहर आणि लगतच्या भागात सकाळी 9 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा जाणवला, त्याचा केंद्रबिंदू कोरबा आणि चंदौटी गावात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खोलवर होता. या भुकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त पाच किमी खोलीवर असल्याने त्यामुळे 20 किमीच्या परिघात असलेल्या घरांचे नुकसान होऊ शकते.
स्थानिक अधिकाऱ्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि जर काही नुकसान झाले असेल तर अहवाल द्या अशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.