नवी दिल्ली -जेव्हा जेव्हा` कॉंग्रेस (Congress) सत्तेवर येते तेव्हा देशात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे धैर्य वाढते.त्यामुळे छत्तीसगड मधील कॉंग्रेस सरकार (Congress Sarkar) या राज्यातील नक्षलवाद रोखण्यास असमर्थ ठरले आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केला आहे. बिश्रामपूर आणि सुरजपुर येथील जाहीर सभेला संबोधीत करताना ते बोलत होते.
छत्तीसगड मधील नक्षलवादामुळे (Nakshalwad) अलीकडच्या काळात भाजपचे अनेक कार्यकर्ते आमच्यापासून हिरावले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी आमच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.(Chhatisgadh vidhansabha)
छत्तीसगडच्या सुरगुजा विभागात कॉंग्रेसच्या राजवटीत मानवी तस्करी आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय वाढत आहे. आमच्या बहिणी आणि मुलींना गुन्हेगारांकडून लक्ष्य केले जात आहे. आदिवासी कुटुंबातील अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत. कॉंग्रेसकडे याचे उत्तर नाही. असा घणाघात यावेळी पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
कॉंग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे छत्तीसगडमधील सुरगुजा भागात सण साजरे करणे कठीण झाले आहे असे ते म्हणाले. द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केल्याचा आरोप देखील पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर सुरूच ठेवला.