– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कुडे बु. येथील भुमिहीन शेतमजुर नारायण बुरुड यांच्या जनावरांच्या गोठ्याला अनपेक्षित लागलेल्या आगीत ५ दुभत्या गाभण गांईसह २ गो-ह्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही घटना कुडे बु. गावाहुन घोटवडी गावाकडे जाणाऱ्या बांगरवाडी रस्त्यावर मंगळवार दि.२७ जुन रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
आग ही जनावरांच्या मांडव परीसरात रचुन ठेवलेल्या चा-याच्या वळई पासुन लागली. दुदैवाने या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. मात्र या दुर्घटनेच्या वेळी पावसाने उघडीप घेतली. तर परीसरात वीजेच्या तारांचाही काही संबध नसल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्ती च्या खोडासाळपणा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुदैवी घटनेत पाच गाईपैकी तीन गाभण गाई होत्या. गोठ्यात एकुण ९ जनावरांपैकी २ गाईना वाचवण्यात यश आले.
तर ७ जनावरांसह घरगुती साहित्य, शेती औजारे आगीत भस्मसात झाली. या आगीत जवळपास चार पाच लाखांचे नुकसान झाल्याने भुमीहीन शेतमुजुराचा नारायण बुरुड यांचा प्रपंच उघड्यावर आल्याने परीसरातील गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीचा तलाठी दिपक कटटे यांनी पंचनामा केला. नारायण बुरुड हे भूमिहीन आहे गावपरीसरातील शेतक-यांची शेती करून काबाड कष्ट करून आपल्या मेहनती ने आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे.
त्याला जोड धंदा म्हणून साऊंड स्पीकर मंडप चा व्यवसाय तसेच दूध धंदा करून आपला संसार उभा केला असताना झालेल्या दुर्घटनेने सर्व काही कष्टाने जमवलेले एका क्षणात नष्ट झाल्याने याची हळहळ व्यक्त होत असताना स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन अर्थिक मदत गोळा करण्यासाठी पुढे सरसावले असल्याचे समाधानकारक चित्र यानिमित्ताने पहावयास मिळत आहे. नारायण बुरुड यांनी कष्ट करत जनावरे घेतली त्यात असे अचानक काल रात्री आगीमध्ये जाळून खाक झाल्याने पुन्हा त्यांचे होत्याचे नव्हते झाले आणि पुन्हा परिस्थिती जेथून सुरवात केली तेथेच शून्यात येऊन पोहचली आहे.
बुरुड कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून निघण्यासारखे नाही. मात्र त्यांचा संसार उभारायला तात्पुरती मदत आपल्यामार्फत व्हावी. या कुटुंबाला शासनाची अधिकाधिक मदत मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याच्या प्रयत्न करूयात. उघड्यावर पडलेला त्यांचा संसार पुन्हा उभारायला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.