बेंगळुरू – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेवरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात 5 बळी घेतले. यासह त्याने भारताचे महान गोलंदाज व माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे.
बुमराहने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 29 कसोटी सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 5 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही 8 वी वेळ आहे. बुमराह आता सर्वात कमी कसोटी खेळून सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने कपिल देव यांना मागे टाकले आहे.
कपिल देव यांनी 29 व्या सामन्यात 8 वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. भारताचा माजी आंतरराष्ट्रीय कसोटीपटू व वेगवान गोलंदाजइरफान पठाण या यादीत तिसर्यीा क्रमांकावर आहे.त्याने 29 कसोटीत 7 वेळा 5 पेक्षा जास्त बळी घेण्याचीकानगिरी केली आहे.बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 8 वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत.