मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या भुमिपुजनावरून सध्या चांगलंच राजकारण सुरु आहे. त्यात कोणाला भुमिपुजनाचं आमंत्रण दिलं जाईल यावर अनेक चर्चा सुरु आहे. हे सगळं सुरु असतानाच अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
आता ज्या ठिकाणी राममंदिर बांधलं जात आहे. त्या राम मंदिराच्या जागेवर या आधी बुद्धविहार होतं. राम मंदिराचं भुमिपुजन होत आहे, त्यासाठी शुभेच्छा आहे, मात्र त्य़ा अयोध्येच्या परिसरामध्ये एक बुद्धविहार असायला हवं, अशा शब्दात आठवलेंनी बुद्धविहाराची मागणी केली आहे.
अयोध्येत बुद्ध विहार उभारण्यासाठी प्रयत्नशील… pic.twitter.com/jgU3XBH4Gx
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 30, 2020
अयोध्येतील काही भागात उत्खनन केलं तर त्याठिकाणी बुद्ध मंदिराचे अवशेष आपल्याला सापडले आहेत. त्यामुळे पुर्वी या परिसरात बुद्ध मंदिर होतं. त्यामुळे बुद्धमंदिर असावंच, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुन सरकारच्या वतीने बुद्धविहारासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करु नाही मिळाली तर खासजी जागेचा शोध घेऊ आणि त्याठिकाणी बुद्धमंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. भारतीयांनी याासाठी मला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.