Budget 2024: देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सबका साथ-सबका साथ या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. तसेच आम्ही सामान्यांच्या हितासाठी काम करत आहोत असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. २०४७ पर्यंत देश विकसित देशांच्या यादीत समावेश असेल असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.
#WATCH | Union Finance Minister Nirmala Sitharaman presents the Union Interim Budget 2024-25.
“…The Indian economy has witnessed a profound positive transformation in the last 10 years, The people of India are looking ahead to the future with hope and optimism. With the… pic.twitter.com/yJUnh3WLze
— ANI (@ANI) February 1, 2024
विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांचा विकास झाला. देशातील ८० कोटी जनतेला मोफत राशन दिले. गरीब महिला आणि युवकांसाठी काम केले तर देश पुढे जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान या अगोदर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अर्थ राज्यमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. महामहिम राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना दही आणि साखर खाऊ घालून अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यासोबत अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि बजेट टीमचे सदस्यही उपस्थित होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पंकज चौधरी हे दोघेही उपस्थित होते.