नवी दिल्ली – सरकारी मालकीच्या बीएसएनएल या कंपनीला सन 2018-19 या वर्षात तब्बल 14000 कोटी रूपयांचा तोटा आला आहे अशी माहिती सरकारच्यावतीने आज लोकसभेत देण्यात आली. याच वर्षात बीएसएनएलचा महसुल पाच हजार कोटी रूपयांनी कमी झाला आहे अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
या तोट्याची कारणे देताना त्यांनी म्हटले आहे की मोबाईल क्षेत्रातील स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले दर, कर्मचारी वर्गावर होणारा मोठा खर्च आणि बीएसएनएला 4 जी सेवेचा अभाव ही यातील काही प्रमुख कारणे आहेत. सन 2016 साली जिओ कंपनी बाजारात आल्यानंतर बीएसएनएल च्या महसुलात घट होत राहिली आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले की सन 2018-19 या वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारावर कंपनीला मिळालेल्या एकूण महसुलापैकी 75 टक्के रक्कम खर्च झाली आहे.