Mumbai Police – एका फसव्या गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडलेल्या गुंतवणुकदारांचा जबाब नोंदवण्यास नकार देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (mumbai police) आर्थिक गुन्हे शाखेला मुंबई उच्च् न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
यामुळे या प्रकरणी आता तब्बल 442 गुंतवणूकदारांचा जबाब नोंदविण्यास ईओडब्ल्यू तयार झाली आहे. 2008मध्ये नोंदविलेल्या गुन्हात 15 वर्षांनी गुंतवणुकदार आपले म्हणणे तपास यंत्रणेकडे मांडू शकणार आहेत.
या याचिकेवर न्या. अजय गडकरी व न्या. शाम चंडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या गुंतवणुकदारांची तब्बल 250 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे.
या गुंतवणूकदारांची पोलिसांनी आपला जबाब नोंदवावा एवढीच मागणी होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे. हायकोर्टाच्या दट्यानंतर नरमाईची भूमिका घेत ईओडब्ल्यूने या गुंतवणूकदारांचा जबाब नोंदवला जाईल, अशी ग्वाही कोर्टाला दिली. दरम्यान, यावरील पुढील सुनावणी 31 जानेवारी 2024 रोजी निश्चित करण्यात आली आहे.