मुंबई – करोनाच्या महामारीशी महाराष्ट्र सरकार यशस्वीपणे झुंज देत असताना राज्यातील सरकारच्या स्थीरतेविषयी शंका उत्पन्न होईल अशा बातम्या पेरल्या जात आहेत. तथापी राज्यातील सरकार पुर्ण स्थीर असल्यानेच भाजपच्या पदरी निराशा येत आहे त्यातूनच असले प्रकार सुरू आहेत अशी टीका राज्यातील एक मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किमान पंधरा वर्ष टिकेल असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीला अजून राज्यपालांनी अनुमती दिलेली नाही त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की राज्यपालांचा अनादर होईल असे मी काहीही बोलणार नाही, उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने प्रस्ताव दिला आहे. त्यावर ते उचित निर्णय घेतील त्यांनी लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे.