Ravi Shankar Prasad On CAA : नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए देशभर लागू केल्याने कोणाच्याही नागरिकत्त्वाला धोका नसून यासंदर्भात विरोधी पक्ष नेते फक्त गैरसमज पसरवत असून नागरिकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रिय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. सीएए कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चेनंतर मंजूर झाल्याची आठवणही प्रसाद यांनी करुन दिली. आता फक्त त्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे, असेही ते म्हणाले.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आरोप केला होता की सीएए लागू करून केंद्र सरकार पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारतात स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करू इच्छित आहे. त्यांना घर आणि नोकऱ्या देणार. आमच्या मुलांमुळे आलेला पैसा ते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना भारतात स्थायिक करण्यासाठी खर्च करतील, असा आरोप त्यांनी केला आहे. | Ravi Shankar Prasad On CAA
यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, केजरीवाल यांचे एक विचित्र विधान आले आहे. हा कोणता तर्क आहे? हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही. केजरीवाल व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. | Ravi Shankar Prasad On CAA
दुसरीकडे, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीएएसंदर्भात स्पष्ट केले की कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. याबाबत विरोधकांकडून निरर्थक आणि चुकीचा प्रचार केला जात आहे. हेच लोक रोहिंग्यांच्या बाजूने उभे आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जे सीएएच्या नावाने जातीय उन्माद पसरवत आहेत त्यांना मी खोटे बोलणे बंद करण्यास सांगेन. ममता बबॅनर्जी, केजरीवाल अशा प्रत्येकाची राजकीय पत घसरली आहे, त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत. | Ravi Shankar Prasad On CAA