हैद्राबाद – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यातच करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त कऱण्यात येत होती. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र देशात करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात हैद्राबाद विद्यापीठाच्या अभ्यासकांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी गेल्या दीड वर्षातील करोना रुग्णांच्या आकडेवारीचा मॅट्रिक्सच्या आधारे अभ्यास करून निष्कर्ष काढला.
करोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट 4 जुलै रोजी सुरु झाली आहे, असं प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असही डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी डॉ. श्रीवास्तव यांनी तीन प्रकारच्या आकडेवारीचा उपयोग केला. यामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या, रोजच्या करोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि दैनंदिन मृत्यूची संख्या होय. या गोष्टींच्या आधारे लाटेची सुरुवात, लाटेचा कळस आणि लाट ओसरत असल्याचे सिद्ध करता येते.
दैनंदिन मृत्यूचे प्रमाण वाढत असेल आणि हे सलग काही दिवसं होत असेल तर ही नव्या लाटेची सुरुवात मानली जाते. अशी परिस्थिती ४ जुलैपासून दिसण्यास सुरू झाली आहे. आकडेवारीतून आणि मॅट्रीक्समधून स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भातील बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.