नवी दिल्ली : ओमायक्रॉनने आता संपूर्ण देशात आपले हातपाय पसरले आहेत. बाधितांबरोबरच या व्हेरियंटमुळे लोकांचा जीव जाण्यास सुरुवात झाली आहे. कारण राजस्थानमध्ये ओमायक्रॉनमुले पहिला बळी गेल्यानंतर आता देशात याच व्हेरियंटने दुसरा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रेणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
ओडीशामधील बोलांगीरमध्ये 55 वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका 73 वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.
दरम्यान, 27 डिसेंबर रोजी संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था (VIMSAR) मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. परंतु, आता मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अगलपूर गावात राहणाऱ्या या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केला नव्हता. गेल्या महिन्यात या व्यक्तीला स्ट्रोक झाला होता. ज्यानंतर उपचारानंतर त्याला 20 डिसेंबर रोजी बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बोलांगीरच्या CDMO स्नेहलता साहू यांनी सांगितले की, दोन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारादरम्यान, महिलेला संबलपूर बुर्लाच्या VIMSAR मध्ये रेफर करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर महिलेचा कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेण्यात आला. पुढच्या दिवशी म्हणजेच, 23 डिसेंबर रोजी महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली होती.
जयपूरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधूमेहासह आणखी काही आजार होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.