मुंबई -भारताच्या कसोटी संघात अष्टपैलू खेळाडू नाही. ती उणीव येत्या काळात हार्दिक पंड्या भरून काढेल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठी पंड्याशी चर्चा करण्यात येणार आहे. पंड्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
मात्र, त्यालाही कसोटी संघात पुनरागमन करण्याची इच्छा आहे. जगभरातील अनेक संघात अष्टपैलूंची संख्या जास्त असते. त्याच धर्तीवर आता भारतीय संघाचीही बांधणी करावी लागणार आहे, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
पंड्याला दुखापत झाल्यानंतर त्याने अनेकदा गोलंदाजी करणे टाळले आहे. मात्र, नेटमध्ये त्याने गोलंदाजी करताना आता त्रास होत नसल्याचे सांगितल्याने त्याचे कसोटी संघातील पुनरागमनही फार लांब नाही, असे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत.