Bollywood: अभिनेता आयुष्मान खुराना याच्या चित्रपटांसह त्याच्या गाण्याचे देखील कौतुक केले जाते. मात्र आता एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. आयुष्मानचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. २०१७ मध्ये आयोजित केलेल्या कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका सोशल मीडिया युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते आहे की आयुष्मानने विविध राज्य आणि क्षेत्रांना मानवंदना देण्यासाठी दुबईमधील एका कार्यक्रमात गाणी गायली आहेत. तो पंजाबी, उत्तर प्रदेश, बंगाली आणि दक्षिण भारतातील लोकांनी मानवंदना देताना दिसला.
यावेळी त्याचा भाऊ आणि अभिनेता अपारशक्ति खुराना गाणे गाताना दिसला. त्यानंतर त्यांनी पंजाब, यूपी, बंगाली आणि दक्षिण भारतातील लोकांसाठी गाणी गायली आणि हे पाकिस्तानी मित्रांसाठी’ असं म्हणत आयुष्मानने ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं गायलं. यानंतर त्याने ‘चक दे इंडिया’ हे गाणंही गायलं. याबरोबरच पाकिस्तानी गायक अली जफरनेसुद्धा या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानबरोबर परफॉर्म केलं होतं.
The clown @ayushmannk was singing “Dil Dil Pakistan” when Pakistanis were kiIIing our soldiers & innocent citizens..
No wonder he’s so upset to see #RamMandir.The reason why I don’t trust most of these Bollywoodiyas. They can even sell their mothers for money… pic.twitter.com/pCqIgJt7r1
— Mr Sinha (@MrSinha_) January 24, 2024
इतकंच नव्हे तर यानंतर आयुष्मानने त्याच कॉन्सर्टमध्ये ‘चक दे इंडिया’ हे गाणं देखील म्हंटलं अन् अली जफरने त्याल उत्तम साथही दिली. परंतु ट्विटरवर फक्त त्याचे ‘दिल दिल पाकिस्तान’ हेच गाणे व्हायरल होत आहे. दुबईमध्ये आयोजित केलेल्या या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानने श्रीलंका, भारत, बांग्लादेश, पाकिस्तान या देशांना मानवंदना देण्यासाठी गाणं म्हंटलं होतं.
व्हायरल व्हिडीओमध्ये आयुष्मानने पाकिस्तानला भेट दिली असून तिथे त्याने हे गाणं म्हंटल्याची अफवाही समोर आली, परंतु ती बातमी खोटी असून हा व्हिडीओ दुबईच्या कॉन्सर्टमधीलच असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘न्यूज रूम पोस्ट’ने या व्हिडीओची शहानिशा करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, नुकत्याच 22 जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला आयुष्यमान देखील हजर राहिला होता. त्यानंतर आता त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने त्याच्यावर अधिक टीका होत आहे.