नवी दिल्ली: अयोध्येतील जमीन वाद प्रकरणी ६ ऑगस्टपासून सुनावणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. निकाल लागेपर्यंत आठवड्यातले तीन दिवस सुनावणी होणार, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निर्णयाचे स्वागत केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेला खटला निश्चित कालावधीत निकाली काढण्यात येईल. असा आम्हाला विश्वास आहे आणि लवकरच राममंदिराचे बांधकाम सुरू होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा अहवाल मध्यस्थी समितीने आज सादर केला आहे. दरम्यान, अयोध्या प्रकरणाची सुनावणी आटवड्यातून ३ दिवस घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.