आळंदी – आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात गंभीर आजार कर्करोगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. ज्ञानेश्वर विद्यालय, आकार चॅरिटेबल आणि इंद्रायणी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी स्वाती देवळे, डाॅ. संजय देशमुख, डाॅ. मंजिरी जोशी, शिप्रा दांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील, दामिनी पथकाच्या अर्चना गबाले, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दीपक मुंगसे, पर्यवेक्षक अशोक बनकर, श्रीरंग पवार, डाॅ. नितीन गोसावी, डाॅ. गौरव राऊत, आशिष देवळे, पोलिस कर्मचारी जालिंदर जाधव, अनिल वडगावकर आदी उपस्थित होते.
डाॅ. संजय देशमुख यांनी यावेळी वाढता कर्करोग, कर्करोगाची कारणे आणि उपाय याबाबत माहिती दिली. डॉ. मंजिरी जोशी यांनी गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी मार्गदर्शन केले. श्रिप्रा दांडे यांनी एचपी लसीचे महत्त्व पटवून दिले. रमेश पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती दिली. दामिनी पथकाच्या अर्चना गबाले यांनी मुलींना कठीण प्रसंगी स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.